राज्यात ऑनलाइन कॅब आणि टॅक्सी सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिक विविध मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासासाठी वाहनांची बुकिंग करतात. याच पार्श्वभूमीवर सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय पुढे आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक टॅक्सी चालकांना उद्योगाची नवी दिशा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला या सेवेसाठी आवश्यक नियमावली तयार करण्याचे आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडेच या प्रकल्पासंदर्भात बैठक पार पडली असून त्यामध्ये योजनेच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
सहकार भारत टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश टॅक्सी चालकांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणे आणि त्यांना स्थिर उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देश हा आहे. चालकांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून थेट जोडले जाणार असल्याने त्यांना अधिक फायदा मिळू शकतो. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना देखील कमी खर्चा
मिळालेल्या माहितीनुसार,या सेवेची माहिती सहकार भारत टॅक्सीचे प्रतिनिधी असलेले कर्नल हिमांशु यांनी दिली. या सेवेची सुरुवात प्रथम मुंबईत केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्येही विस्तार करण्यात येणार आहे.
या नव्या सहकारी टॅक्सी मॉडेलमुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील, तर चालकांसाठीही उत्पन्न वाढीचा नवा मार्ग खुला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सेवेमुळे प्रवाशांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवा राज्यातील काही छोट्या शहरात सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.