BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश


मुंबई :  मुंबईतील नगर पथविक्रेता अर्थात फेरीवाल्यांचे प्रश्न आता मार्गी लागला जात असून म्हणजे फेरीवाल्यांना क्यू आर कोड (QR Code) आधारित ओळखपत्र देण्याची कार्यवाही आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्यावतीने उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेवून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मुंबईच्या महापौरांनीही आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे याला यश मिळत असल्याचे म्हटले आहे.


या संदर्भात माहिती देताना मुंबईच्या महापौर (Mayor) रितू तावडे (Ritu Tawde) म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाताना नागरिकांना वचन दिले होते की, मुंबईत पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजित हॉकिंग झोनची निर्मिती केली जाईल. त्यासाठी फेरीवाला समिती गठीत करून घेणे, त्यानंतर सर्व पात्र फेरीवाल्यांना नागरी फेरीवाला समितीने ठरविलेल्या हॉकिंग झोनमध्ये स्थलांतरित करून पुनर्वसन करणे, फेरीवाल्यांना क्यू. आर. कोड सहित लायसन्स कम आयकार्ड वितरीत करणे, ही सर्व कार्यवाही करण्यात येईल.



या पार्श्वभूमीवर, महापौर म्हणून मी पदभार स्वीकारल्यानंतर १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा निश्चित करताना त्यामध्ये पात्र फेरीवाल्यांबाबतचा मुद्दाही समाविष्ट केला. त्या दिशेने महानगरपालिकेतील फेरीवाला धोरणाची सर्व माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली. या विषयातील अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.


नगर पथविक्रेता अर्थात फेरीवाला समितीची ऑगस्ट २०२४ मध्ये निवडणूक झाली तरी न्यायप्रविष्ट कारणांमुळे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. या अनुषंगाने महानगरपालिकेतील अनुज्ञापन आणि विधी खाते यांच्या संयुक्त बैठका घेतल्या. नगर पथविक्रेता समिती निवडणूक अंतर्गत मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी माननीय न्यायालयाने परवानगी द्यावी, या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी विधी खात्याला निर्देश दिले. त्यानुसार २८ मार्च २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होऊन नगर पथविक्रेता समित्यांचा प्रश्न मार्गी लागला.


निवडून आलेल्या सदस्यांव्यतिरिक्त, नगर पथविक्रेता समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. त्या आधारे महानगरपालिकेकडे अर्ज देखील प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी आणि पडताळणी करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.



एवढेच नव्हे तर, न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि नगर पथविक्रेता अधिनियम आधारे एकूण ९९,३४५ फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याची सूचनाही संबंधित खात्याला केली होती. त्यासाठी स्थायी समितीमध्ये विषय मंजूर करण्यात आला. फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात असून लवकरच या फेरीवाल्यांना क्यू आर कोड आधारित ओळखपत्र वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली आहे. फेरीवाल्यांशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार आहे. कोणावरही अन्याय होऊ नये आणि पात्र असलेल्यांपैकी कोणीही लाभापासून वंचित राहू नये, यादृष्टीने आपण सर्वसमावेशक प्रयत्न यापुढेही करणार आहोत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.