Ratnagiri News :रत्नागिरी हादरली ! तीन मित्रांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.खेड शहरातील भोस्ते गावाच्या सीमेवर जगबुडी नदीत चार मित्र पोहायला गेले होते. त्या चौघांपैकी तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.



नेमकं घडलं काय ?


मिळालेल्या माहितीनुसार, उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी व पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चार मित्र जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. भोस्ते गावाच्या परिसरात नदी खोल असल्याचं सांगितलं जातं, विशेषतः ज्या भागात हे चौघे पोहत होते तो भाग अतिशय खोल असल्याचे सांगतात. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा व्यवस्थित अंदाज आला नाही आणि एकत्र पोहत असलेले चार मित्र बुडू लागले. ते बुडत असल्याचे बघून स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक एकाला वाचवू शकले पण तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच चौघांच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचे बघून एकदम शोककळा पसरली. नातेवाईक आक्रोश करू लागले. खेड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.




तीन तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ


घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धावले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे. नदी, धरणे आणि डोहांच्या परिसरात पर्यटक आणि तरुणांची मोठी गर्दी असते, पण अनेकदा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटनाची, पोहण्याची, साहसी खेळांची मजा लुटताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तीन तरुण मुलांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर