Water Storage Maharashtra : राज्यात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

पाऊस आठवडाभर लांबणार; धरणांमध्ये १० हजार ४२१.९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा


मुंबई : मान्सूनने राज्यातील काही भागांत प्रवेश केला असला तरी सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आणखी किमान आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटून अवघ्या २५.५१ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ३०.५३ टक्के होता. विशेषतः पुणे विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा १५.५४ टक्क्यांपर्यंत घसरल्याने घरगुती पाणीपुरवठा, शेती आणि उद्योगांसाठीच्या नियोजनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.


राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ३ हजार २८ धरणांमध्ये सध्या १० हजार ४२१.९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या १० जून २०२६ रोजीच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्यांवरील ताण वाढू लागला आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागात सर्वाधिक ३८.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून नागपूर विभागात ३६.९८ टक्के साठा आहे. कोकण विभागात ३१.२६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात २८.१७ टक्के आणि नाशिक विभागात २६.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, पुणे विभागातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून तेथील धरणांमध्ये केवळ १५.५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.



गेल्या वर्षी याच दिवशी पुणे विभागातील धरणांमध्ये २६.८२ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा तब्बल ११ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये सध्या २ हजार ३७०.२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, नीरा देवघर, डिंभे, मुळशी, कोयना आणि वारणा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमधील साठाही अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.


राज्यातील अनेक धरणांमधील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचे संकेत दिले असले, तरी प्रत्यक्षात व्यापक आणि मुसळधार पाऊस होईपर्यंत जलसाठ्यांवरील दबाव कायम राहणार आहे. विशेषतः पावसाने आणखी ओढ दिल्यास पुणे विभागासह राज्यातील काही भागांतील पाणीपुरवठ्यासमोर गंभीर आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




विभागनिहाय पाणीसाठा (टक्केवारीत)


- अमरावती : ३८.४०


- नागपूर : ३६.९८


- कोकण : ३१.२६


- छत्रपती संभाजीनगर : २८.१७


- नाशिक : २६.६६


- पुणे : १५.५४


राज्याचा एकूण पाणीसाठा : २५.५१ टक्के
गेल्या वर्षी याच दिवशी : ३०.५३ टक्के

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी