Palghar Accident : शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पालघर:  पालघर जिल्ह्यातील शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर एक भीषण अपघात (Accident) घडला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या अपघातात पारोळ गावातील उद्योजक, शेतकरी रवींद्र गोपाळ पाटील (Ravidra Patil) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे वसई आणि पारोळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Palghar Accident)



प्राथमिक माहितीनुसार, रवींद्र पाटील हे आपल्या दुचाकीवरून पारोळहून शिरसाडकडे जात होते. शिरसाड नाका परिसरात त्यांच्या पुढे धावणाऱ्या एका हायवा टिपिंग ट्रकने कोणताही इंडिकेटर न देता अचानक डावीकडे वळण घेतले. ट्रक अचानक आडवा आल्याने पाटील यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेली.


अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, ट्रकच्या अवजड चाकाखाली चिरडल्याने रवींद्र पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर ओव्हरलोड रेती आणि खडी वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अशा वाहनांवर आरटीओ आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच मार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


रवींद्र गोपाळ हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र यांच्या जाण्याने राजकारणात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी