Operation Tiger in BMC : मुंबई महापालिकेतही लवकरच ऑपरेशन टायगर

- तब्बल २१ नगरसेवक टप्प्यात?


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


उबाठाचे सहा खासदार फुटल्यानंतर याचे पडसाद आता मुंबईतील आमदार आणि नगरसेवकांमध्ये उमटू लागले आहेत. त्यामध्ये एकप्रकारची अस्थिरता नगरसेवकांमध्ये निर्माण झाली असून विशेषत: ईशान्य मुंबईतील नगरसेवकांमध्येच ही अस्थिरता स्पष्ट दिसून येत होती. मात्र, या ऑपरेश टायगरच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील उबाठाचे तब्बल २१ हून अधिक नगरसेवक शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ऑपरेशन टायगरची झलक मुंबई महापालिकेतही पहायला मिळणार आहे. त्यामुळे उबाठा आपल्या नगरसेवकांना कशाप्रकारे वाचवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Operation Tiger in BMC)



मुंबई महापालिकेत उबाठाचे ६५ नगरसेवक असून विरोधी पक्षात असूनही त्यांचे महापालिकेत काही चालत नाही. उबाठाकडे विरोधी पक्षानेता पद आहे. परंतु विरोधी पक्षाची भूमिका सध्या उबाठा ऐवजी काँग्रेसच अधिकपणे मांडताना दिसत आहे. मात्र,उबाठाच्या एकूण ९ खासदारांपैंकी सहा खासदार फुटल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. या सहा खासदारांपैकी एक खासदार हे ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील हे आहेत. पाटील यांची कन्या राजुल पाटील ११४मधून विजयी होत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. परंतु या ऑपरेशन टायगर नंतर राजुल पाटील या बुधवारी पडलेल्या महापालिका सभेला गैरहजर राहिल्या. (Operation Tiger in BMC)



या ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे १५ नगरसेवक आहेत, तर उबाठाचे ११ आणि शिवसेनेचे ०४, एमआयएमचे सहा तसेच इतर दोन अशाप्रकारे नगरसेवक संख्या आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतील ११ नगरसेवकांवर संशयाची नजर फिरु लागली असून यातील एका नगरसेवकाचे सदस्यत्व जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरवले गेले आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच महापालिका घेणार आहे. मात्र, ईशान्य मुंबईसोबतच संपूर्ण मुंबईतील उबाठाचे २१ पेक्षा अधिक नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन असून या दिवशी ऑपरेशन टायगरचा विस्तार मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे. उबाठाचे काही नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याचा परिणाम दिसून येईल असेही बोलले जात आहे. उबाठाच्या नगरसेवकांना निधी मिळालेला नसून निधी शिवाय कामे करणे नगरसेवकांना शक्य होत नाही. त्यामुळे काही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून काही नगरसेवक हे शिवसेनेत जाण्यास तयार नाहीत त्यांना भाजपात सामावून घेतले जाईल असेही बोलले जात आहे. त्यामुळे खासदारांनंतर आमदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचे मिशन पूर्ण केले जाईल असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्याला जायचे त्यांनी खुशाल जावे असे म्हटले आहे, त्यामुळे उबाठाचे काही नगरसेवकही नाराज झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत काही नगरसेवक असून याचा परिणाम दिसून असेही दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. (Operation Tiger in BMC)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.