Sanjay Dina Patil : एका व्यक्तीच्या त्रासामुळे मी पक्ष सोडला ; खासदार संजय दिना पाटील यांचा आरोप

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले. उबाठाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे जाहीर करत शिवसेनेत प्रवेश केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रम उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.



खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया

पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी उबाठा सोडण्याचे कारण सांगितले. त्यांनी थेट नाव घेणे टाळले पण चतुराईने संजय राऊतांकडेच इशारा केला.संबंधित व्यक्तीबद्दल आपण पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार केली. पण आपल्या बाजूने निर्णय घेण्यात आला नाही किंवा आपल्या अडचणीवर तोडगा काढण्यात आला नाही. म्हणून हा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.

मला ठाकरे कुटुंबीयांचा त्रास नव्हता

"मला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्याबद्दल कोणताही प्रोब्लेम नाही. सगळ्यांनी मला मान-सन्मान दिलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान दिलेला आहे. मी पण तेवढ्याच गोष्टी करतो. कुणी मला एक रुपया करतो तर मी शंभर रुपये करतो. तेवढं केलेलं आहे", असं संजय दिना पाटील म्हणाले. मात्र एका व्यक्तीमुळे हे सर्व झालं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.



पक्षाचे मालक कोण आहेत ?

संजय दिना पाटील म्हणाले "काल आपण सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात बघितलं असेल, पक्षाचे मालक बदली झाले आहेत ना? सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात येताना बघितलं ना तुम्ही, पक्षाचे मालक कोण आहेत ?","एक व्यक्ती आम्हा सर्वांना डिस्टर्ब करत आहे. आम्ही कुठल्या कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. आम्ही खासदार झाल्यावरही निधी वापरू शकत नाहीत. कोण शाखाप्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही. मला कार्यक्रमाला बोलवू शकत नाही. कारण काहीही सांगतात आणि नंतर इकडे येऊन सांगतात की कार्यक्रमाला येत नाही.

उद्धव यांनी हे आधी करायला हवं होत

उद्धव ठाकरे आता सर्व खासदारांच्या मतदारसंघात जात आहेत. पण हेच आधी आले असते, तर आता येण्याचीदेखील गरज पडली नसती. मला ज्या व्यक्तीकडून त्रास आहे त्याला सुनावलं असतं तर ही वेळच आली नसती ना? मी शिवसेनेत प्रवेश केला नसता तर इतरांचाही प्रवेश झाला नसता. मला बोलावून घेतलं असतं, आम्ही जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्या तिकडे येऊन माफी मागा. मी त्यांच्याबरोबर 'मातोश्री'वर गेलो असतो. विषय संपला असता. पण त्यांना ते करायचंच नाही. त्यांना ताकदवान लोकं नको. त्यांना गुलाम लोकं पाहिजेत", अशी टीका संजय दिना पाटील यांनी केली.
Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली