Meghna Sakore-Bordikar : ठाणे जिल्ह्याच्या पाणी नियोजनासाठी आता राज्य सरकारची उच्चस्तरीय संयुक्त बैठक

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे विधान परिषदेत आश्वासन


मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठा, नगरविकास आणि जलसंपदा या तिन्ही महत्त्वाच्या विभागांची उच्चस्तरीय संयुक्त बैठक आयोजित केली जाणार असून, यातून ठाणे जिल्ह्याचा व्यापक 'कृती आराखडा' तयार केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पाणीपुरवठा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज विधान परिषदेत केली.



विधान परिषदेत आज आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे ठाणे(thane) जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित केला होता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांसारख्या शहरांत वेगाने होणारे नागरीकरण आणि त्या तुलनेत पाणी स्त्रोतांची कमतरता यावर त्यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली. वाढत्या लोकसंख्येसाठी भविष्यातील जलसुरक्षेची गरज अधोरेखित करतानाच, नव्या गृहप्रकल्पांना पाणी उपलब्धता अहवाल (Water Availability Report) अनिवार्य करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.



राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची भूमिका


आमदार ॲड. निरंजन डावखरे(ad.niranjan davkhare) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत, राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सविस्तर उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, "सध्या बारवी धरण हे ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी जीवनवाहिनी आहे. हवामानातील बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, औद्योगिक वापराच्या पाण्यात कपात करून समतोल राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुंबई-ठाणे महानगर प्रदेशासाठी 'शिलार' आणि 'पोशीर' ही दोन नवीन धरणे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सभागृहात जाहीर केले. तसेच, पाणी नियोजनाचा प्रश्न अनेक विभागांशी निगडित असल्याने, पाणीपुरवठा, नगरविकास आणि जलसंपदा या विभागांची संयुक्त बैठक घेऊन एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या