Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे भविष्यात रोपवेने प्रवास करणे अधिक स्वस्त होणार आहे. सध्या प्रतिव्यक्ती सुमारे ३५० रुपये मोजावे लागणारे तिकीट नवीन व्यवस्थेनंतर ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान ठेवण्याचा शासनाचा विचार आहे. या निर्णयामुळे रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना आणि शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.



सध्या रायगडावरील खासगी रोपवेचे तिकीट अनेकांसाठी महाग असल्याने अनेक शिवभक्त गडावर पायी चढाई करतात. नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर कमी खर्चात आणि कमी वेळेत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह सर्व वयोगटातील पर्यटकांना याचा फायदा होईल.


महाराष्ट्र शासनाच्या या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाची मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. नवीन अत्याधुनिक रोपवे सुरू झाल्यानंतर रायगडावरील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच शिवभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.



रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेमार्फत प्रतिव्यक्ती सुमारे ३२५ रुपये भाडे आकारले जाते. याशिवाय गडावरील संवर्धनासाठी नेण्यात येणाऱ्या साहित्यावरही प्रतिकिलो शुल्क आकारले जात असल्याने विकासकामांचा खर्च वाढतो. नवीन सरकारी रोपवे सुरू झाल्यानंतर हा अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत होणार असून गडावरील संवर्धनाची कामेही अधिक वेगाने करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी