Tukaram Mundhe : आता दुधात भेसळ करणारे रडारवर

अन्न आणि औषध प्रशासनाकडून नवी नियमावली; आयुक्त तुकाराम मुंढे यांची घोषणा


मुंबई (Mumbai) : हॉटेल व्यावसायिक, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा दूध सम्राटांकडे वळवला आहे. "ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध आणि सुरक्षित दूध पोहोचणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे दुधातील भेसळ आणि कृत्रिम दुधाचा काळाबाजार मुळापासून उपटून टाकण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण पुरवठा साखळीसाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे. 'फार्म टू प्लेट' या तत्त्वानुसार दूध संकलन केंद्रापासून ते अगदी किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांना या नियमांचे पालन करावे लागेल; अन्यथा परवाने (License) रद्द केले जातील," असा इशारा तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. या मोहिमेसाठी प्रशासनाने 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग' ही विशेष राज्यव्यापी मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.



गेल्या काही दिवसांत हॉटेल आणि बेकरी व्यवसायात आपल्या कारवाईचा धाक दाखवल्यानंतर मुंढे यांनी आता दूध क्षेत्रातील गैरव्यवहारांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या आणि नमुन्यांच्या विश्लेषणातून दूध पुरवठा साखळीमध्ये काही अत्यंत गंभीर त्रुटी सातत्याने समोर आल्यानंतर हा सर्वंकष अनुपालन आदेश जारी करण्यात आला आहे. याविषयी मुंढे म्हणाले, "हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तपासणीदरम्यान असे आढळून आले की, अनेक जण पेस्ट कंट्रोल केल्याचे सर्टिफिकेट दाखवतात, मात्र प्रत्यक्षात तिथे पेस्ट कंट्रोल केलेले नसते. अशा बोगसगिरी करणाऱ्या हॉटेल्सचे लायसन्स आम्ही तात्काळ रद्द केले आहे. त्यामुळे मला कागदी घोडे नकोत, प्रत्यक्ष काम न दिसल्यास दुकान किंवा व्यवसाय बंद पाडला जाईल," अशा शब्दांत त्यांनी मुजोर व्यावसायिकांना सुनावले.





एफडीएने केलेल्या निरीक्षणात दूध व्यवसायात काही गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यानुसार, दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची भेसळ करणे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि 'मेलामाइन' यांसारख्या घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम (सिंथेटिक) दूध तयार करणे. 'मिल्क फॅट' आणि 'एसएनएफ'(SNF)च्या कायदेशीर मानकांचे उल्लंघन करणे. दूध टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या शीतसाखळीचे पालन न करणे. विनापरवाना किंवा विनानोंदणी बेकायदेशीरपणे व्यवसाय करणे आणि चुकीचे लेबलिंग करून ग्राहकांची दिशाभूल करणे, असे मुढे म्हणाले.



संकलन ते विक्री साखळीतील सर्वांना ८ नियम बंधनकारक

या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी दूध उत्पादक आणि वितरकांची बैठक घेऊन त्यांच्यासमोर सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले. "आपल्या आहारात दूध हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकसमान सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. नवीन नियमावलीनुसार उत्पादकांपासून ते अंतिम विक्रेत्यांपर्यंत ८ प्रकारचे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. दूध संकलन केंद्रे, शीतकरण (Coling) सेंटर्स, दुग्ध प्रक्रिया युनिट्स, वाहतूकदार, घाऊक आणि किरकोळ विक्रेते या सर्वांना हे नियम बंधनकारक राहतील," असे त्यांनी स्पष्ट केले. दूधासह पनीर, खवा, तूप, दही, लोणी, क्रीम, चीज, दूध पावडर आणि आईस्क्रीम यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांवरही ही नवी नियमावली लागू असणार आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी