Uday Samant : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार

- मंत्री उदय सामंत यांची घोषणा; सर्व परवानग्या पूर्ण, मुंबईकरांची पाणीचिंता मिटणार


मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन मनोरी येथे उभारण्यात येणारा २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा खारे पाणी गोडे करण्याचा (नि:क्षारीकरण) महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. "या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या सर्व पर्यावरणीय परवानग्या प्राप्त झाल्या असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांची पाणीटंचाईची चिंता कायमची मिटण्यास मोठी मदत होईल," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी मुंबईतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सभागृहाच्या पटलावर ठेवला. या चर्चेत भाजप आमदार योगेश सागर यांनीही उपप्रश्न उपस्थित करून प्रशासकीय गतीबाबत विचारणा केली. मंत्री उदय सामंत म्हणाले, "सध्या मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी अशा विविध सात धरणांमधून मुंबईला दररोज सुमारे ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सद्यस्थितीत मुंबई शहराची एकूण दैनंदिन गरज ४ हजार ६६५ दशलक्ष लिटर इतकी आहे. म्हणजेच मुंबईला दररोज सुमारे ५६५ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भासत आहे. ही वाढती तूट भरून काढण्यासाठीच मनोरीचा नि:क्षारीकरण प्रकल्प अत्यंत गेमचेन्जर ठरणार आहे."


हा प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्त्वावर (जेव्ही) विकसित केला जात असून, यासाठी 'मे. जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेड' आणि 'मे. आय.डी.ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड' यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या बांधकामाची एकूण किंमत ४ हजार ७७ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कार्यादेशानुसार (वर्क ऑर्डर) प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने (४ वर्षे) असून, त्यानंतर पुढील २० वर्षांसाठी या प्रकल्पाचा प्रचलन व परिचालन (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) कालावधी निश्चित करण्यात आला आहे.



१ हजार लिटर पाण्यासाठी ३५ ते ४४ रुपये खर्च


या प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) संदर्भातील सर्व आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर, समुद्रकिनाऱ्यावरील खारे पाणी प्रक्रिया करून पिण्यायोग्य करण्यासाठी प्रति १ हजार लिटर मागे अंदाजे ३५ ते ४४ रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच प्रति लिटर १५ ते १७ पैसे इतक्या माफक दरात मुंबईकरांना हे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.