एकाच कुटुंबातील पाच जण गायब ! पळाले की घातपात ? नेमकं घडलं काय ?

Nagpur : नागपूरच्या धानतोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्य २४ जूनपासून बेपत्ता झाले आहेत. मागील ११ दिवसांपासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. धानतोली पोलीस ठाण्यात पाच जण हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ते शेवटचे पुण्यात राहत असल्याचे समजते.



नेमकं घडलं काय ?


श्यामसुंदर (७१ वर्षीय) आणि त्यांचे भाऊ सुरेश पारसवानी यांचे कुटुंब धानतोली परिसरात एकत्र राहत होते. २४ तारखेला सुरेश पारसवानी यांच्या कुटुंबातील पाच सदस्य कोणालाही न कळवता अचानक घरातून निघून गेले. नातेवाईकांनी या पाच जणांचा सर्वत्र शोध घेतला, ओळखीच्या लोकांची चौकशी केली, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.(Lawrence Bishnoi Gang)



बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे : हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे)



पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, बेपत्ता असलेल्या सदस्यांपैकी एकावर मोठ्या प्रमणावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या बोजाला कंटाळून या कुटुंबाने घर सोडले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरची तांत्रिक तपासणी(Technical Analysis) केली असता, सर्वांचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. हे सर्वजण स्वतःहून पुण्यात गेले की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे? याचा तपास सध्या धानतोली पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी