Ashish Shelar : रिफायनरी किंवा अणुऊर्जा प्रकल्प कातळशिल्पांच्या आड येणार नाहीत!

- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; 'एआय'च्या माध्यमातून इतिहासपूर्व जीवनशैलीची पुनर्निर्मिती


मुंबई : मानवी उत्क्रांतीच्या आणि इतिहासपूर्व काळाच्या इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील ऐतिहासिक कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांचे नियोजन केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भारतीय पुरातत्त्व खाते आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोकणात अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प होणार नाही आणि या ऐतिहासिक वारशाला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे स्पष्ट करतानाच, कातळशिल्पांच्या परिसराचा विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.



विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे कोकणातील कातळशिल्पांच्या दुरवस्थेचा आणि विकास प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, विक्रांत पाचपुते आणि नाना पटोले यांनी सहभाग घेत कातळशिल्पांच्या जतनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले की, कोकणातील रत्नागिरी विभागातील सुमारे ३०० किलोमीटर लांब आणि २५ किलोमीटर रुंद क्षेत्रामध्ये २ हजारपेक्षा जास्त कातळशिल्पे आणि १५० हून अधिक कातळशिल्प स्थळे सापडली आहेत. या अमूल्य वारशाचे सूक्ष्मदृष्टीने आणि सर्व ऋतूंमध्ये दृकश्राव्य चित्रीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ८ एप्रिल २०२६ रोजीच्या शासननिर्णयान्वये, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनवण्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा निधी उपलब्ध झाला आहे. (Ashish Shelar)


आंतरराष्ट्रीय बाजाराचे सर्वेक्षण करून या माहितीपटाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला ४५ मिनिटांचा एक उच्च दर्जाचा सिनेमॅटिक माहितीपट तयार केला जाईल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनशैलीची दृश्य स्वरूपात पुनर्निर्मिती केली जाणार आहे. यासोबतच, युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट असलेल्या ९ स्थळांवर व त्यांच्या बफर क्षेत्रातील स्थळांवर स्वतंत्र ८ मिनिटांचे लघु माहितीपट आणि या संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करणारा एक 'बिहाईंड द सीन्स' माहितीपटही बनवला जाईल. (Ashish Shelar)



डिजिटल प्रसारासाठी 'कंटेंट बँक' :


या चित्रीकरणाचे सर्व रॉ फुटेज, ड्रोनद्वारे केलेले हवाई चित्रीकरण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे राज्य शासनाच्या संचालनालयाच्या ताब्यात राहतील. या दृकश्राव्य सामग्रीच्या आधारे समाजमाध्यमांसाठी (सोशल मीडिया) विशेष इन्फोग्राफिक्स आणि डिजिटल प्रसारासाठी आवश्यक 'कंटेंट बँक' विकसित केली जाणार आहे. कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी कातळशिल्प परिसराचा विकास आणि सेवासुविधा उपलब्ध करून देणारा कृती आराखडा तयार झाला असून, त्यानुसार संरक्षण भिंती उभारणे व अन्य कामे सुरू झाली आहेत. ही कातळशिल्पे ज्या खासगी जमीन मालकांच्या जागेत आहेत, त्यांनाही पर्यटन विकासाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होईल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केले. (Ashish Shelar)

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव