Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; 'या' तालुक्यांमधील शाळांना सुट्टी

Nashik : नाशिकमध्ये रविवारपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. ढगसदृश्य परिस्थिती नाशिकमध्ये टळली असली तरी नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने (IMD) 'येलो अलर्ट' जारी केला असून, उद्या म्हणजेच ९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.(nashik rain update)



इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील पूर्व प्राथमिक (Pre-school) तसेच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ​या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी माहिती दिली आहे. सध्या दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांवर होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची एक तातडीची बैठक पार पडली, ज्यामध्ये सर्व विभागांशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (nashik rain update)



​'या' ६ तालुक्यांमधील शाळा राहणार बंद


​उद्या, ९ जुलै रोजी जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता खालील ६ तालुक्यांमधील पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत:


त्र्यंबकेश्वर (त्र्यंबक)


​कळवण


​इगतपुरी


​पेठ


​सुरगाणा


​बागलण



​त्र्यंबकेश्वर मंदिर सुरू, तर सप्तशृंगी गड बंद


​धार्मिक स्थळांबाबत माहिती देताना राजपूत यांनी स्पष्ट केले की, धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या निर्णयानुसार त्र्यंबकेश्वर मंदिर उद्या (९ जुलै) भाविकांसाठी खुले राहणार आहे. मात्र, दुसरीकडे उपविभागीय अधिकारी कळवण यांच्या आदेशानुसार सप्तशृंगी गड ७ जुलै ते ९ जुलै या कालावधीत बंद ठेवण्यात आला असून, हा निर्णय उद्यापर्यंत कायम राहणार आहे. (nashik rain update)



पर्यटनस्थळे आणि धबधबे पुढील रविवारपर्यंत बंद


​पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि धबधबे येत्या पुढच्या रविवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, आठवडे बाजार आणि धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आठवडे बाजारांबाबत स्थानिक परिस्थितीचा विचार करून तेथील क्षेत्रीय अधिकारी योग्य तो निर्णय घेतील.


​जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना या संपूर्ण कालावधीत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त