Pravin Darekar : वक्फ बोर्डाचा लेखा परीक्षण अहवाल १७ वर्षांपासून प्रलंबित

 दरवर्षी अहवाल सादर करणे बंधनकारक; २००८ पासून आजतागायत हिशेब न दिल्याने कारवाई करा


मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने गेल्या १७ वर्षांपासून आपला एकही लेखा परीक्षण (Audit)अहवाल विधिमंडळाला सादर केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी असा अहवाल सादर करणे कायद्याने बंधनकारक असतानाही २००८ पासून आजतागायत हिशेब न देणाऱ्या वक्फ बोर्डावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी 'पॉईंट ऑफ प्रोसिजर'च्या माध्यमातून विधानपरिषदेत केली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वक्फ बोर्डाच्या या कारभाराची गंभीर दखल घेत सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणी शासनाला सविस्तर निवेदन करण्याचे निर्देश दिले आहेत.



सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना आमदार दरेकर म्हणाले की, 'वक्फ अधिनियम १९५५' च्या कलम ८० नुसार दरवर्षी आपला लेखा परीक्षण अहवाल वक्फ बोर्डाने राज्य शासनाला आणि शासनाने तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपुढे सादर करणे अनिवार्य आहे. मात्र, वक्फ बोर्डाकडून गेल्या १७ वर्षांत एकदाही या नियमाचे पालन झालेले नाही. या संदर्भात हिंदी विधी परिषदेने १८ मार्च २०२५ रोजीच अल्पसंख्यांक मंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले होते; परंतु दुर्दैवाने आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.



वक्फ बोर्डाकडे आजमितीला सुमारे १ लाख एकर इतकी प्रचंड जमीन आहे. तसेच या बोर्डाच्या कार्यालयीन खर्चासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरवर्षी सरकारी तिजोरीतून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. असे असतानाही गेल्या १७ वर्षांपासून ऑडिट अहवाल सादर न केल्यामुळे, या शासकीय निधीचा विनियोग कसा झाला आणि जमिनीच्या व्यवहारात नक्की काय घडले, या संपूर्ण पारदर्शकतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वक्फ बोर्डाचा कारभार तपासण्याचा अधिकार विधिमंडळाला असताना, १७ वर्षे हा अधिकार डावलला जाणे हा एक प्रकारे सभागृहाचा अपमान आहे, असे दरेकर म्हणाले.





बोर्ड बरखास्त करण्याची मागणी


वक्फ अधिनियमाच्या कलम ९९ चा हवाला देत दरेकर म्हणाले की, आपल्या कायदेशीर कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या वक्फ बोर्डाला बरखास्त करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. इतकी वर्षे अहवाल रखडवूनही बोर्डावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता शासनाने यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याबाबतचे निवेदन सभागृहात सादर करावे, असे निर्देश सभापतींनी द्यावेत अशी विनंती दरेकरांनी केली. आमदार दरेकर यांच्या या मागणीनंतर सभापती राम शिंदे यांनी सरकारला या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. सभापतींच्या या निर्देशावर सरकारची बाजू मांडताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी, सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार शासन या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल, असे आश्वस्त केले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.