Maharsahtra Weather : राज्यात पावसाचा जोर ओसरला; बहुतांश जिल्ह्यांना दिलासा, १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने अखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून अनेक भागांतील पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज (१० जुलै) घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. (Weather Update)



कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही रंगीत इशारा नसल्याने मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra rain)


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल जाणवत आहे. अनेक दिवसांनंतर काही भागांत सूर्यदर्शन झाले असून हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. (Monsoon Update)



मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पेरणीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. (IMD)


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. सततच्या पावसानंतर अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होत असल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. (Maharashtra monsoon)


विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Weather)


दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभाग व कृषी विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी