Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात 'ऑपरेशन शोध-खत’ ,15 दिवसांत 98 अल्पवयीन मुलांचा शोध

Ahilyanagar : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार राज्यात ‘ऑपरेशन शोध-खत’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी (Ahilyanagar District Police) उल्लेखनीय यश मिळवत एकूण 98 बेपत्ता बालकांचा शोध लावला आहे. शोधण्यात आलेल्या सर्व बालकांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



15 दिवसांत 98 अल्पवयीन मुलांचा शोध


'ऑपरेशन शोध-खत’ ही विशेष मोहीम 8 ते 23 जून 2026 या कालावधीत अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हात राबवण्यात आली. हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मोहिमेदरम्यान 90 मुली आणि 8 मुले, अशा एकूण 98 बेपत्ता बालकांचा (Missing children) शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या सर्वांची आवश्यक कायदेशीर पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे (Police Station) , उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील विशेष पथके तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (Anti-Human Trafficking Unit) यांनी समन्वयाने या मोहिमेसाठी काम केले.



भविष्यातही मोहीम राबवणार


नागरिकांनी त्यांच्या परिसरात कोणतेही बेपत्ता बालक आढळल्यास किंवा संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यासोबतच अल्पवयीन मुलांचे अपहरण, बेपत्ता होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि हरवलेल्या बालकांचा वेगाने शोध घेण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



विशेष पथकांकडून शोध


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांशी प्रभावी समन्वय साधला. प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याने स्वतंत्र विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबविली. त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या संख्येने बेपत्ता बालकांचा शोध घेणे शक्य झाले.


दरम्यान, ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (Superintendent of Police Mummaka Sudarshan) , अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (Vaibhav Kalubarme) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले (Ganesh Ugale) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे (Kiran Shinde) आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त