Ashadhi Wari 2026 : आता वारीत मोबाईल चार्जिंगचे टेन्शन विसरा; महाऊर्जाकडून वारकऱ्यांसाठी 'सोलर' दिलासा!

मुंबई : आषाढी वारी २०२६ (Ashadhi Wari 2026) मध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वारीदरम्यान मोबाईलची बॅटरी संपण्याची चिंता आता वारकऱ्यांना करावी लागणार नाही. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे वारकऱ्यांना कुटुंबीयांशी सतत संपर्कात राहणे, आवश्यक माहितीची देवाणघेवाण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मोबाईलचा सहज वापर करणे शक्य होणार आहे. (Ashadhi Wari 2026)


आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari 2026) श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडींमध्ये २५ जुलै २०२६ पर्यंत सोलर मोबाईल चार्जर संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जेवर आधारित ही सुविधा वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.



वारीचा प्रवास अनेक दिवसांचा आणि शेकडो किलोमीटरचा असल्याने मोबाईल चार्जिंग ही वारकऱ्यांसमोरची मोठी अडचण असते. यावर उपाय म्हणून महाऊर्जाने सौरऊर्जेवर चालणारे मोबाईल चार्जर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच अक्षय ऊर्जेचा प्रभावी वापरही होत आहे. (Ashadhi Wari 2026)


राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन धोरणाला चालना देणारा हा उपक्रम स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेचा संदेश देणारा ठरत आहे. वारकऱ्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सौरऊर्जेबाबत जनजागृती करण्याचाही महत्त्वाचा उद्देश या उपक्रमामागे आहे. (Ashadhi Wari 2026)



महाऊर्जाने वारकऱ्यांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले असून, आध्यात्मिक वारीला आधुनिक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेची जोड देणारा हा उपक्रम यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण ठरत आहे. (Ashadhi Wari 2026)

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या