BMC : मुंबईतील दुघर्टनांवर चर्चा, पण उबाठाचे रामाच्या नावाने राजकारण

सभागृहात मुंबईतील दुघर्टनांवर बोलण्याऐवजी रामाच्या नावाच्या घोषणा देत घातला गोंधळ


मुंबई : मुंबईत पावसाळ्यातील (Mumbai Rains) दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालिन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये उबाठाने (UBT) रामाच्या नावाने राजकारण करायला सुरुवात केली. आजवर रामाचे नाव न घेणाऱ्या उबाठाने सभागृहात आल्यापासून ते पुढे जय श्री राम... राम मंदिरकें चोरोंको, जुते मारो सालोंको अशा घोषणा देत मुंबईकरांच्या जिवनाशी निगडीत मुद्दयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील २५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या उबाठाने मुंबईचे वाट लावली असून त्यांना आता त्यावरही उपाययोजना सुचवण्यासाठी त्यावर राजकारण करण्यात अधिक स्वारस्य असल्याचे दिसून आले.



मुंबई महापालिकेत मनसे गटनेते यशवंत किल्लेदार, काँग्रेसचे अश्रफ आझमी, उबाठाच्या श्रध्दा जाधव आणि टी जगदिश यांच्या मागणीनुसार विशेष सभेचे आयोजन महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी केले होते. या विशेष सभेमध्ये उपस्थित राहिल्यानंतर उबाठाच्या नगरसेवकांनी जय श्री राम यांच्या नावाने घोषणा देण्यास सुुुरुवात केली. उबाठाच्या घोषणांनंतर भाजपच्या नगरसेवकांनीही जय श्री रामच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृहातील कामकाजाला वेगळेच वळण लागले. त्यामुळे या गोंधळात आयुक्तांच्या उपस्थित न राहण्याच्या मुद्दयावरून अधिक गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर महापालिका सभागृहात १० मिनिटाकरता सभा तहकूब करण्यात आले.


सभागृहात मुंबईत उद्भवणाऱ्या पावसाळ्यातील दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन केलेले असल्याने यावर सर्व सदस्यांकडून साधक बाधक चर्चा होणे आणि उपाययोजना सुचवणे आवश्यक होते. पण उबाठाने या विषयाला भलतीकडे वळवून हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला. उबाठाला मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत चिंता नसून त्यांना राजकारणात अधिक स्वारस्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. डोक्यावर भगव्या आणि पांढऱ्या टोप्या घालून त्यांनी रामाच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे उबाठाला जिथे या मुद्दयावर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची संधी होती, तिथे उबाठाने रामाच्या नावाचा गजर करत सत्ताधारी पक्षाला यांच्या चुका दाखवून उपायोजना काय करायच्या याची संधी हातची घालवून दिली.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.