Ketan-Siya Case : केतन-सिया प्रकरणात मोठा ट्विस्ट! या कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता ?

Mumbai : पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना सुरुवातीला एक अपघात मानली जात होती. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करून सत्य उघडकीस आणले. त्यांच्या तीन आठवड्यांच्या तपासानंतर हे प्रकरण एक भीषण आणि थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे समोर आले.तरुण व्यावसायिक केतन फक्त २५ वर्षांचा होता. त्याचे लग्न सिया गोयलसोबत ठरले होते. मात्र, लग्नाच्या काही दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात, पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधात अडर ठरत असलेल्या केतनची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.(Ketan Agrawal)



चेतन-सियाची निर्दोष सुटका होणार ?


लोहगड येथे केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप सिया गोयलवर आहे. न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी, पोलिसांना ठोस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि भक्कम पुरावे सादर करावे लागतील. कायदा मोठ्या प्रमाणावर परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून असल्याने, पुराव्यांची अखंड साखळी तयार करणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असेल. चिंताजनक बाब म्हणजे, या साखळीतील एक छोटीशी चूक देखील सिया आणि चेतन यांना फायदा मिळवून देऊ शकते आणि शिक्षेतून सुटका करून घेऊ शकते. त्यामुळे,हा गुन्हा न्यायालयात कसा सिद्ध केला जाईल यावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,केतनला कोणी ढकलले हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही आहे. जरी चेतन आणि सियाने कबुली दिली असली, तरी त्यांच्या दिलेल्या कबुलीजबाबांना न्यायालयात काहीही किंमत नसते,असे वकील तनवीर अहमद मीर यांनी सांगितले आहे. वकील तनवीर अहमद यांनी २००८ साली आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात तलावर कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करून त्यांना निर्दोष सुटका मिळवून दिली होती.



२००८ - आरुषी हत्याकांडसारखी परिस्थिती


आरुषी-हेमराज हत्याकांडात एका कुटुंबावर मोठ्या प्रमणावर संशय होता. त्यावेळी जनतेने त्यांना आरोपी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले होते. मात्र उच्च न्यायालयाने या निकालाल कायदेशीर तत्त्वांच्या आधारे रद्द केले.त्या प्रकरणात, खुनाच्या रात्री घरात कोणाही बाहेरच्या व्यक्तीने प्रवेश केला नव्हता, हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही. बचाव पक्षाने एक प्रबळ पर्यायी शक्यता मांडली की, तिसऱ्याच व्यक्तीने (जसे की कंपाऊंडर कृष्णाने) हा खून केला असू शकतो. बचाव पक्षाला कृष्णानेच खून केलाय हे सिद्ध करण्याची गरज नव्हती; त्यांना फक्त न्यायालयाच्या मनात वाजवी शंका निर्माण करायची होती.(Aarushi-Hemraj murder case)



मग केतन अग्रवाल प्रकरणात पुढे काय ?


पुणे पोलीसांना सर्व पुरावे न्यायालयात सिद्ध करावे लागतील. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा दुवा ती कडा असेल, जिथून केतन खाली पडला. किल्ल्याचा उतार, ती कडा, येण्या-जाण्याचा मार्ग आणि केतनचे बूट यावरून हा एक साधा अपघात (घसरणे) होता असे दिसते का? आणि जर त्याला ढकलले गेले असेल, तर ते मुद्दामहून ढकलले होते की वादावादी किंवा झटापटीदरम्यान अचानक घडले? पुणे पोलिसांना न्यायालयात खुनाशिवाय इतर सर्व संभाव्य शक्यता पूर्णपणे नाकाराव्या लागतील.लोकांनी सियाला दोषी ठरवले असले तरी पोलीसांना कोर्टाला ठोस पुरावे देण्याची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी