Mumbai News: समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवण्याची अमित साटम यांची मागणी; महापौर आणि आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबईतील (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी समुद्रात मिळणाऱ्या सर्व नाले आणि नद्यांच्या मुखाशी ट्रॅश बूम बसवण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवले आहे.



पत्रात साटम यांनी नमूद केले आहे की, पावसाळ्यात नाले आणि नद्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच इतर घनकचरा समुद्रात वाहून जातो. भरती-ओहोटीच्या वेळी हाच कचरा पुन्हा समुद्रकिनाऱ्यांवर येत असल्याने किनारे अस्वच्छ होतात आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो.


सध्या काही ठिकाणी ट्रॅश बूमची व्यवस्था असली तरी ती अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे समुद्रात मिळणाऱ्या प्रत्येक नाल्याच्या आणि नदीच्या मुखाशी ट्रॅश बूम उभारण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


याशिवाय, ट्रॅश बूममध्ये अडकलेला कचरा नियमितपणे हटवण्यासाठी वर्षभर २४ तास कार्यरत राहील अशी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचीही त्यांनी सूचना केली आहे.



पर्यावरण संरक्षण, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता (Beach Cleaning) आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे सांगत, महापालिकेने त्याला प्राधान्य देऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती अमित साटम यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.