Corporator Sonam Jamsutkar : महापालिकेची धरणे, जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये मुलांच्या सहली आयोजित करा

- भावी पिढीला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी नगरसेविकेने केली ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत सध्या पाणी टंचाई असून या पाण्याची बचत करण्यासाठी मुंबईकरांवर पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व आता सर्व जनतेला कळावे आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. परंतु पाण्याचे महत्व खऱ्या अर्थान भावी पिढीला कळावे यासाठी महापालिकेच्यावतीने मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत, भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रे आदी ठिकाणी महापालिका व खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी, याची अशी मागणी उबाठाच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी केली आहे. या सहलीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना या मुंबई शहराला जलस्त्रोतातून होणारा शुद्ध पाणीपुरवठा या प्रात्यक्षिकाचे ज्ञान व जलसंवर्धनाबाबतची भावना विकसित होईल,असे त्यांनी म्हटले आहे. (Corporator Sonam Jamsutkar)


नगरसेविका सोनम जामसूतकर (Corporator Sonam Jamsutkar) यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. या मागणीमध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की,मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील जनतेला मुंबईत असलेल्या विहार व तुळशी तसेच मुंबईपासून सुमारे १०० ते १७५ कि. मी. अंतरावर असलेल्या तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा ह्या सात जलस्त्रोतांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावातील पाण्यावर पिसे तसेच भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुध्दीकरण केल्यानंतर ते जनतेला विविध जलाशयांच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. (Corporator Sonam Jamsutkar)



जलशुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करुन विस्तृत जलवाहिनी जाळ्यांद्वारे दररोज ४१०० लिटर्स इतका शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून वाढती लोकसंख्या, हवामान बदल व पाण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. (Corporator Sonam Jamsutkar)



भावी पिढीमध्ये पाण्याचे महत्व, पाणीपुरवठा व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि जलस्त्रोतांचे संवर्धन याविषयी प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान निर्माण होण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने 'मुंबई जलदर्शन शैक्षणिक सहल' अंतर्गत महापालिका शाळा तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक सहली आयोजित करणे आवश्यक आहे; त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे व भांडुप संकुल येथे महापालिका व खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी. अशी मागणी सोनम जामसूतकर (Corporator Sonam Jamsutkar) यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.