Ketan Agrawal Murder : 'माझ्या मुलाला न्याय द्या', पुणे व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आईचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भावनिक ईमेल पाठवत मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (Ketan Agrawal Murder)


पत्रात राखी अग्रवाल यांनी आपल्या वेदना व्यक्त करत, एक दिवस स्वतःच्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावं लागेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असे म्हटले आहे. “प्रत्येक आईप्रमाणे मी केतनचं उज्ज्वल भविष्य, त्याचं लग्न आणि आमच्यासोबतचं आयुष्य पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण त्याऐवजी मला माझ्याच मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले,” अशी हळवी भावना त्यांनी व्यक्त केली. (Pune Crime News)



केतनची हत्या अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. “केतन गेला, त्या दिवशी माझं जगच संपलं. घरातील प्रत्येक कोपरा, त्याची खोली, कपडे आणि फोटो आजही त्याची आठवण करून देतात,” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. (Justice For Ketan Agrawal)


राखी अग्रवाल यांनी पत्रात केतनच्या आजोबांचाही उल्लेख केला. नातवाच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे एका महिन्याच्या आत निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही आठवड्यांतच कुटुंबावर दोन पिढ्यांचा शोक ओढवला, असे त्यांनी नमूद केले. (Crime)



“मी सहानुभूती किंवा कोणतीही विशेष सवलत मागत नाही. मला फक्त न्याय हवा आहे. कृपया केतनला केवळ आणखी एक प्रकरण म्हणून पाहू नका. तो कोणाचा तरी मुलगा, नातू आणि भाऊ होता; पण माझ्यासाठी तोच माझं सर्वस्व होता,” असे भावनिक आवाहन त्यांनी पंतप्रधानांकडे केले आहे. (Murder)


यापूर्वी केतन अग्रवाल यांच्या वडिलांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलीस (Pune Police) तपास सुरू असून सर्व संबंधित बाबींचा सखोल तपास केला जात आहे.



Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी