Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा


मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून (Chipi Airport) नवी मुंबईपर्यंत विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) असा तब्बल १० ते १२ तासांचा खडतर प्रवास आता अवघ्या १ तासावर येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला अधिक वेग येणार आहे.


गेल्या काही महिन्यांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गावी ये-जा करण्यासाठी प्रवाशांना संपूर्णपणे रस्ते किंवा रेल्वे मार्गावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबई विमानतळावरून चिपीसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Nitesh Rane)



पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, "१५ ऑगस्टपूर्वी 'फ्लाय ९१' ही विमान कंपनी चिपी ते नवी मुंबई या मार्गावर आपली सेवा सुरू करणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशातील आघाडीची 'इंडिगो' विमान कंपनीची सेवाही या मार्गावर प्रवाशांसाठी उपलब्ध होईल". सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी शनिवार व रविवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी विमानसेवा सुरू आहे. (Nitesh Rane)



पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला मिळणार गती :


नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांसह कोकणात येणारे व्यावसायिक, मोठे गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. आता विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना सिंधुदुर्गात पोहोचणे अधिक सोपे व सोयीस्कर होणार असून, यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणालाही मोठी चालना मिळणार आहे. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.