Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने आवश्यक उपाययोजना राबवल्या असून, मंत्रालयातील पाणी पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फतही पाण्याची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती विभागाने दिली आहे. (Mantralaya Water)



पाण्याच्या ३० टाक्यांची संपूर्ण स्वच्छता :


सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ जुलै २०२६ रोजी मंत्रालयातील जमिनीखालील पाण्याची टाकी तसेच मुख्य आणि विस्तार इमारतींवरील एकूण ३० पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण साफसफाई केली. यापुढे सर्व टाक्यांची दर १५ दिवसांनी नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनांनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (Mantralaya Water)



BMCच्या प्रयोगशाळेचा अहवाल; पाणी पिण्यास योग्य : 


मंत्रालयातील पाण्याचे नमुने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. २९ एप्रिल २०२६ आणि १० जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. याशिवाय, महापालिकेने मंत्रालयात येणाऱ्या पाण्याचे तसेच जमिनीखालील आरसीसी टाकीमध्ये साठवलेल्या पाण्याचे नमुने तपासले असून, १० जुलैच्या अहवालानुसार हे पाणीही सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Mantralaya Water)



३३ वॉटर प्युरिफायरचे सर्व्हिसिंग पूर्ण :


पाणीपुरवठ्याची गुणवत्ता अधिक चांगली ठेवण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य आणि विस्तार इमारतीतील एकूण ३३ जलशुद्धीकरण यंत्रणांचे (वॉटर प्युरिफायर) सर्व्हिसिंग पूर्ण करण्यात आले आहे. (Mantralaya Water)



तज्ज्ञ समितीकडून स्वतंत्र तपासणी सुरू :


पाणीपुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ११ जुलै २०२६ रोजी मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १३ जुलै रोजी मंत्रालयातील जमिनीखालील टाकी, टेरेसवरील टाक्या तसेच मुख्य आणि विस्तार इमारतीतील प्रत्येक मजल्यावरील पाण्याचे नमुने सलग तीन दिवस संकलित केले असून, त्याचा सविस्तर अहवाल लवकरच अपेक्षित आहे. (Mantralaya Water)



प्रसाधनगृहांचीही नियमित स्वच्छता :


सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले की, मंत्रालयाच्या मुख्य आणि विस्तार इमारतीतील एकूण ८८ प्रसाधनगृहांची स्वच्छता नियुक्त कंत्राटदारामार्फत निश्चित वेळापत्रकानुसार दररोज नियमितपणे केली जात आहे. मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि महापालिकेच्या अहवालामुळे पाणीपुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून, स्वतंत्र तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mantralaya Water)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.