Nashik : खासगी वसतिगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या, शहरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक शहरात खळबळजनक घटना घडली आहे. खासगी वसतिगृहात राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.



अंजली कैलास बागुल असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. अंजली संदीप फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,अंजलीने वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील तिच्या खोलीत स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



अंजलीने टोकाचं पाऊल का उचललं ?


अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अंजलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे अंजलीच्या कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.


Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये