Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा


मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राखण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे ०९ जुलै २०२६ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटांसह मोठी भरती येणार असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन या विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा असे एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला. जमा करण्यात आलेल्या या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.(Mumbai News)



महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समुद्रकिनारा विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात आला. स्वच्छता कामांचे नियमित नियोजन, देखरेख आणि आवश्यक त्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. विशेषतः मान्सून काळात भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा तात्काळ हटविण्यासाठी यंत्रसामग्री, वाहने आणि आवश्यक मनुष्यबळाची प्रभावी उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. या व्यापक स्वच्छता उपक्रमामुळे नागरिक आणि पर्यटकांना स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.



मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राहावेत, यासाठी महानगरपालिका सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. विशेषतः मान्सून काळात भरती - ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत असल्याने तो तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके नियमितपणे समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करून कचऱ्याचे संकलन व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे कार्य करत आहेत. समुद्रकिनाऱ्यांच्‍या स्वच्छतेकामी नागरिकांचाही सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे,असे आवाहन महापालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे.(Mumbai)





  1. ९ जुलै ते दिनांक १९ जुलै २०२६ या कालावधीतील कचरा विल्हेवाट

  2. १.१ किलोमीटर लांबीच्‍या गिरगाव चौपाटी येथून ३३.६६ मेट्रिक टन,

  3. ५ किलोमीटर लांबीच्‍या दादर - माहीम समुद्रकिनारा १५२.१० मेट्रिक टन,

  4. ३.५ किलोमीटर लांबीच्‍या चिंबई - वारिंगपाडा समुद्रकिनारा १२७.२० मेट्रिक टन,

  5. ८ किलोमीटर लांबीच्‍या मढ - मार्वे समुद्रकिनारा ४४. २८ मेट्रिक टन,

  6. ६ किलोमीटर लांबीच्‍या जुहू समुद्रकिनारा १,८२५ मेट्रिक टन,

  7. ४.५ किलोमीटर लांबीच्‍या वेसावे समुद्रकिनारा येथून २७७.६० मेट्रिक टन

  8. सरासरी ७ किलोमीटर लांबीच्‍या गोराई समुद्रकिनारा ३८.८२ मेट्रिक टन

  9. एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचरा उचलून लावली विल्हेवाट

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.