Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पेरण्या लांबणीवर टाकाव्या लागल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची स्थिती विस्कळीत राहिल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना मोठा वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऊस पीक वगळता राज्यात २० जुलैअखेर सरासरी खरीप क्षेत्रापैकी ७४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. (Kharif sowing 2026)



राज्यातील सरासरी १४४.३६ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १०६.७९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा १ जून ते २० जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ४२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पेरणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात ८८ टक्के पेरणी पूर्ण झाली होती, तर यंदा ही आकडेवारी ७४ टक्क्यांवर पोहोचली आहे. (monsoon 2026)



विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सर्वाधिक ८९ टक्के पेरणी झाली असून छत्रपती संभाजीनगर विभागात ७९ टक्के, नाशिक विभागात ७८ टक्के आणि लातूर विभागात ७७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागात ६३ टक्के, पुणे आणि नागपूर विभागात प्रत्येकी ६१ टक्के पेरणी झाली असून कोकण विभागात केवळ १५ टक्के पेरणी झाली आहे.सोयाबीन पिकाच्या लागवडीत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये मिळून ११३ टक्के पेरणी झाली आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ८७ टक्के सोयाबीनची लागवड झाली आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ८८ टक्के, तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ७० टक्के सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे.



तूर पिकाच्या पेरणीत नाशिक विभाग आघाडीवर असून येथे १२१ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ९१ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८६ टक्के, कोल्हापूर विभागात ८३ टक्के, नागपूर विभागात ७८ टक्के, पुणे विभागात ६२ टक्के आणि लातूर विभागात ५७ टक्के तुरीची पेरणी झाली आहे. मक्याच्या लागवडीत अमरावती विभागाने सर्वाधिक १४२ टक्क्यांचा टप्पा गाठला असून नाशिक विभागात १२८ टक्के, कोल्हापूर विभागात १०० टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ९४ टक्के, पुणे विभागात ८८ टक्के, नागपूर विभागात ८५ टक्के आणि लातूर विभागात ४२ टक्के मका पेरणी पूर्ण झाली आहे. समाधानकारक पावसामुळे आगामी काही दिवसांत उर्वरित क्षेत्रातील पेरण्याही पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन