Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यामुळे तसेच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.(Mumbai News)



विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियामध्ये धान लागवडीची कामे वेगाने सुरू असून शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत घेत आहेत. धान लागवडीसाठी महिला मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाल्याने ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.(Heavy Rain)



याउलट अकोला जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्याप बाकी आहे. पावसाची २२ टक्के तूट असल्याने धरणांमधील पाणीसाठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता वाढली आहे. उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार अल्पकालीन पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.



अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत असल्याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वातावरणातील बदल, मान्सूनच्या प्रणालीतील चढ-उतार, एल निनो आणि ला निना यांसारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव