Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून थेट ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे ८०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या वाढीचा लाभ राज्यातील सर्वच भागांना समान प्रमाणात मिळालेला नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील जलस्थिती अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Water Storage)

जूनअखेर राज्यातील धरणांमध्ये केवळ ३२४.५४ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या महिनाभरात धरणांमध्ये ४७८ टीएमसीहून अधिक पाण्याची भर पडली. त्यामुळे राज्याच्या एकूण जलसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. (Water Storage)



पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोयना (६८ टक्के), उजनी (६८ टक्के), भातसा (८७ टक्के), मुळशी (९५ टक्के), डिंभे (८५ टक्के), भंडारदरा (९० टक्के) आणि कन्हेर (९४ टक्के) या धरणांमधील साठा दिलासादायक आहे. (Dam Water Level)

मात्र, छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांची स्थिती अद्यापही समाधानकारक नाही. या विभागातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, राज्यातील महत्त्वाच्या जायकवाडी धरणात फक्त ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनाचे आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.राज्यातील जलसाठ्यात एकूण वाढ झाली असली तरी पावसाचे असमान वितरण लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि प्रभावी जलव्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. (Marathwada Dam)
Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न