Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे मानले जात असून तब्बल २२ जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Weather)



कोकणात मुसळधार पावसाचा इशारा :


कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Weather)



उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस :


धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Weather)



घाटमाथ्यावर मुसळधार सरी :


पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Weather)



मराठवाड्यात पावसाची हजेरी :


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड आणि परभणी जिल्ह्यांतही तुरळक पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Monsoon Weather)



विदर्भातही पावसाचा प्रभाव :


अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Monsoon Weather)



पुढील २-३ दिवस पावसाचा जोर कायम :


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची सक्रियता कायम राहणार आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या भागांतील नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त क्षेत्रे आणि डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Weather)

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी