Nashik Crime News : 'शिवनाथ आयुर्वेद'चा परवाना कायमचा रद्द, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगांव येथील डॉ मोहन पुरी यांच्या शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनी (Shivnath Ayurveda Products Company) नावाच्या औषध निर्मिती कंपनीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने कायमचा रद्द केला आहे. (Nashik Crime News)



अन्न व औषध प्रशासनाकडून छापा


डॉ. मोहन पुरी यांचे नाव संगमनेरजवळील वडगाव पान येथील कथित भोंदू राजेंद्र गडगेबाबा प्रकरणात सहआरोपी म्हणून समोर आले होते. गडगेबाबांच्या दरबारात बोगस औषधांचा पुरवठा केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाने जायगांव येथे छापा टाकून प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीत औषध निर्मितीचे निकष पाळले जात नसल्याचे, उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे आणि औषध व प्रशासन कायद्यातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. (Nashik Crime News)



शिवनाथ आयुर्वेदाचा परवाना कायमचा रद्द


अन्न व औषध प्रशासनाने परवाना प्रकरणी कंपनीची बाजू जाणून घेतली तसेच वस्तुस्थितीचा आढावा घेतला. नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने ३० जून २०२६ रोजी अंतरिम आदेश पारित केला. त्यानुसार शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीचा औषध निर्मिती परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, डॉ. मोहन पुरी हे भोंदू राजेंद्र गडगेबाबांचे निकटवर्तीय असून विविध भोंदूबाबांना औषधांचा पुरवठा करत असल्याचा संशयही तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये