Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार


मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीसाठी संबंधित कामांना गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Gargai Dam)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गारगाई जलसिंचन प्रकल्प आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वन मंत्री गणेश नाईक, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव एकनाथ डवले यासह वन विभाग आणि नगर विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Mumbai Water Supply)



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यात आली असून, मे २०२९ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गारगाई धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याला बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.



गारगाई धरण प्रकल्पाला गती; मे २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट


६५८ हेक्टर बुडीत क्षेत्रात वन जमीन जात असल्याने १४०० हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच बुडीत वन क्षेत्रासाठी वन विकासासाठी वन विभागाला राज्यातील विविध जिल्ह्यात जमीन देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८४४ हेक्टर जमीन बाधित होणार असून, त्यामध्ये १८६ हेक्टर खासगी जमीन आणि ६५८ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एकूण ८०५ हेक्टर जमीन येणार आहे.प्रकल्पामुळे ओगदा आणि खोडदे ही दोन गावे पूर्णतः, तर पाचघर, तिळमाळ, फणसगाव आणि आमले ही चार गावे अंशतः बाधित होणार आहेत.


या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹३,०६५ कोटी असून, त्यामध्ये धरण, जलबोगदा, पुनर्वसनासाठी आवश्यक २२ पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच वीज निर्मिती संचाचा समावेश आहे. याशिवाय जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, पर्यायी वनीकरण, वृक्षांचे निव्वळ वर्तमान मूल्य, सल्लागार सेवा आदी बाबींवरील खर्च कंत्राटी खर्चापेक्षा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.



गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त होत असून केंद्रीय जनजातीय मंत्रालय (MOTA), राष्ट्रीय भूकंप संकल्पन मानक समिती यासह गारगाई धरण प्रकल्प संकल्पचित्र तांत्रिक मंजु-या आणि पर्यावरण परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची मंजूरी साठी कार्यवाही करण्यात येत आहे.


यासंदर्भात पुनर्वसन आणि पर्यावरणीय उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी