Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी (२८ जुलै) राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)


गेल्या काही दिवसांपासून राज्यात संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. काही भागांत उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना, अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवसही पावसाची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज आहे.



कोकणात मुसळधार पावसाचा जोर :


कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये हलका ते मध्यम, तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता :


पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)



उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस :


धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.



मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज :


छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



विदर्भात पावसाचा सर्वाधिक प्रभाव :


चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



हवामान विभागाचे नागरिकांना आवाहन :


वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी मेघगर्जनेच्या वेळी शेतातील कामे टाळावीत तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. एकूणच, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा