Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. पत्रकारितेतील चिंतनशील, व्रतस्थ व्यक्तिमत्त्व आणि विविध विषयांचे गाढे अभ्यासक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, राजकारण आणि सिंचन अनुशेष हे लक्ष्मणराव जोशी यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. पत्रकार म्हणून एखादा प्रकल्प दत्तक घेऊन त्यावर सातत्याने लेखन करण्याची परंपरा त्यांनी रुजवली. गोसीखुर्द प्रकल्पावर त्यांनी केलेले विपुल लेखन त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.


लक्ष्मणराव जोशी यांनी 'तरुण भारत'मध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावत मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. निवृत्तीनंतरही त्यांनी गोवा आणि इतर ठिकाणच्या विविध वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून कार्य केले. तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही त्यांनी आपली लेखणी अखेरपर्यंत सक्रिय ठेवली.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "संपादकपदावर असतानाही हाडाचे पत्रकार कसे असतात, याचे लक्ष्मणराव जोशी हे मूर्तिमंत उदाहरण होते. माझ्या वडिलांच्या काळापासून त्यांचा परिचय होता. त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने अभ्यासू आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व मी गमावले आहे."


लक्ष्मणराव जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी