Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal) प्रकल्पाला राज्य सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.


मंत्रालयात भगवती बंदर (Bhagwati Port) येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते (Nitesh Rane) बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, कोकण किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदरातील क्रुझ टर्मिनल हा राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील आणि रत्नागिरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल.


मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. भगवती बंदरातील अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलमुळे (cruise terminal) केवळ रत्नागिरीच नव्हे, तर संपूर्ण कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पातून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, मत्स्यव्यवसाय आणि लघुउद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांना थेट लाभ होणार असून स्थानिक उद्योजकांसाठी नव्या व्यवसायाच्या संधीही निर्माण होतील.



मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह इतर आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी (TEFS) पूर्ण झाली असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.


यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन हा प्रकल्प साकारावा, असे निर्देशही त्यांनी (Nitesh Rane) दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.