Jalgaon Accident : टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Jalgaon Accident : जळगाव शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी घडलेल्या अपघातात भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा या भीषण अपघातात जखमी झाला आहे. टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.


मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे तर या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (२९) किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग करून त्याला पकडत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. ( Jalgaon Accident News )



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगला माळी (Mangala Mali) या नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मुलगा भरत याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा (Pimprala) येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी निघाल्या होत्या. शहरातील महामार्गावरून जात असताना मागून भरधाव वेगाने एक टँकर आला आणि या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोघे मायलेक रस्त्यावर फेकले गेले. मंगला माळी या रस्त्यावर कोसळताच टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. ( Jalgaon Accident News )



टँकरचालक पोलिसांच्या ताब्यात


दरम्यान, अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग केला. नागरिकांनी काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर (Mahadev Hospital) टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नागरिकांच्या धाडसामुळे चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ( Jalgaon Accident News )



कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर


मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी