Nashik : नाशिकच्या रस्त्यांवरून राजकारण तापलं, राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान

Nashik : नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक इतकं सुंदर केलं होतं, तर तुमचा एकही नगरसेवक पुन्हा निवडून का आला नाही ? असा थेट सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे.



...तर दोन चार नगरसेवक निवडून आले असते


राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. नाशिककरांनी आपलं सरकार पाहिलं. तुमचे महापौर पाहिले. जर खरंच शहराचा इतका विकास झाला असता, तर जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली असती. मात्र एकही नगरसेवक निवडून आला नाही. एवढं सुंदर नाशिक केलं होतं तर लोकांनी असा रिजल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्याचं उत्तर द्या. नाशिकमध्ये काहीही केलं नाही. नुसत्या गप्पा केल्या. सुंदर हरीत काहीही केलं नाही. नाशिक सुंदर केलं तर मग तुमचे दोन चार नगरसेवक निवडून आले असते. कुणालाच निवडून दिलं नाही. यावरून तुम्ही काय केलं हे दिसतं. लोकांना सर्वांना माहीत आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.



राज ठाकरेंना गिरीश महाजनांचे खुले आव्हान


दरम्यान, गुजरातच्या कंत्राटदारांना नाशिकची कामे दिल्याचा राज ठाकरे यांनी केलेला आरोपही महाजन यांनी फेटाळून लावला. 'शहरातील सुरू असलेल्या सर्व कामांच्या कंत्राटदारांची यादी देतो. त्यात एक तरी गुजरातचा किंवा बाहेरच्या राज्यातील कंत्राटदार दाखवावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले. नाशिकमध्ये सध्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, त्याचे ठेकेदार सांगावेत. आऊटर रिंगरोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार त्यांनी सांगावेत. त्याची यादी देतो. त्यातही गुजरातचे कोण ते सांगावे. घाटाची कामे सुरू आहे. सर्व यादी देतो. बाहेर राज्यातील ठेकेदार कोण आहे हे त्यांनी सांगावं. ऑनलाईन टेंडर कोणीही भरू शकतो. तरी सुद्धा बाहेरचे ठेकेदार कोण हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच महाजन यांनी दिलं



यात भ्रष्टाचार कसा असेल ?


भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. पालिकेची अनेक कामे २० ते २२ टक्के कमी दराने, तर दुरुस्तीची कामे ३० टक्के कमी दराने मंजूर झाली आहेत. फायबर केबलची कामेही ४२ टक्के कमी दराने देण्यात आली आहेत. यात भ्रष्टाचार कसा असेल? आयआयटीसारख्या संस्थेमार्फत कामांचे परीक्षण केले जात आहे. विनाकारण राजकीय आरोप करू नयेत असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली