Nashik : सुरगाण्यात अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित, भूकंपीय हालचालींवर आता रिअल-टाईम नजर

Nashik : नाशिक जिल्ह्यातील भूकंपीय हालचालींवर आता अधिक अचूक आणि प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Center for Seismology) कडून सुरगाणा येथे अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ (State-of-the-art broadband seismograph) आधारित भूकंप मापन केंद्र (Earthquake measuring station) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रातून नोंद होणारी भूकंपाची माहिती रिअल-टाईममध्ये थेट नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे.



भूकंप मापन केंद्रासाठी तीन ठिकाणांची निवड


नाशिक जिल्ह्यात भूकंप मापन केंद्रासाठी (Earthquake measuring station) सुरगाणा, बागलाण तालुक्यातील हरणबारी-वडे दिगर आणि मालेगाव या तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यापैकी सुरगाणा तहसील कार्यालयात भूकंप मापन यंत्रणा यशस्वीरित्या बसवण्यात आली आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे कमी तीव्रतेच्या भूकंपांचीही अचूक नोंद घेता येणार आहे. तसेच सूक्ष्म भूकंपीय हालचालींचा वेळेत शोध घेणे आणि भूकंपाचे केंद्रस्थान निश्चित करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.



मोहपाडा आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रम


दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा येथील आश्रमशाळेत भूकंपाबाबत जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि ग्रामस्थांना भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे नियम आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने कसा प्रतिसाद द्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी छोट्या नाटिकेच्या माध्यमातून भूकंपाची निर्मिती कशी होते, याचे प्रात्यक्षिकही सादर केले.



भूकंप मापन यंत्रणा जिल्ह्यासाठी उपयुक्त


भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज वर्तविणे शक्य नसले, तरी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केल्यास त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नाशिक जिल्ह्यात उभारलेली अत्याधुनिक भूकंप मापन यंत्रणा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देणारी ठरणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भूकंपाबाबत योग्य माहिती व सुरक्षिततेच्या सवयी रुजविणे ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने आपत्तीच्या काळात घाबरून न जाता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहावे. असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२