CM Devendra Fadnavis : भारताला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परकीय शक्तींना 'भारत छोडो' म्हणण्याची वेळ



मुंबई : "काही परकीय शक्ती भारताच्या प्रगतीचा वेग पाहून घाबरल्या असून आपल्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करून देशाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हातात तिरंगा घेऊन बाहेर पडलेल्या या अथांग युवाशक्तीला रोखण्याची आणि भारताला महासत्ता होण्यापासून थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी हाती माईक घेत 'दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये' हे देशभक्तीपर गीत गायल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला. (CM Devendra Fadnavis)


वरळी येथे आयोजित या भव्य तिरंगा रॅलीला मुंबईकरांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. हातात डौलाने फडकरणारा राष्ट्रध्वज आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण वरळीचा परिसर दुमदुमून गेला होता.(Vande Mataram)



उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मला आज इथे दोन महासागर पाहायला मिळत आहेत. समोर एकीकडे अथांग हिंद महासागर आहे आणि दुसरीकडे माझ्यासमोर हा जनसागराचा 'तिरंगा महासागर' उसळलेला दिसतो आहे. ज्या तिरंग्याची आन-बान-शान राखण्यासाठी आमचे क्रांतिकारक फासावर चढले आणि सीमेवर जवानांनी आपले प्राण पणाला लावले, त्यांच्याच बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी हा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकला. जोपर्यंत जगात चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कधीही खाली येणार नाही." (Tiranga)


आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. आयटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आज जगातील बलाढ्य देशांशी बरोबरीने मुकाबला करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून, जगभरात जे कोणालाही जमले नाही ते आज आपल्या देशाने करून दाखवले आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला भारत हा जगातील सर्वांत ऊर्जावान देश बनला आहे, असेही त्यांनी सांगितले.(CM Devendra Fadnavis)



परकीय शक्तींना 'भारत छोडो' म्हणण्याची वेळ


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत जगात क्रमांक एकची महासत्ता बनेल अशी भीती काही आंतरराष्ट्रीय शक्तींना वाटत आहे. म्हणूनच ते भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही भारतमाता आता थांबणारी नाही. २०४७ पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली 'विकसित भारत'ची संकल्पना प्रत्यक्षात आलेली पाहायला मिळेल. ९ ऑगस्ट १९४२ ची क्रांती ही ब्रिटिशांविरुद्धची 'भारत छोडो' चळवळ होती. आजची नवभारताची क्रांती ही 'करो या मरो' आणि 'विकसित भारत' घडवण्याची आहे. त्यामुळे आता देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्या भारतविरोधी आणि परकीय शक्तींनाच 'भारत छोडो' म्हणायची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला. (CM Devendra Fadnavis)



मुख्यमंत्र्यांनी गायले देशभक्तीपर गीत


भाषणापूर्वी 'दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये' हे प्रसिद्ध गाणे सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अचानक हातात माईक घेतला आणि संगीताच्या तालावर हे गाणे गाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांचा हा अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. त्यांच्या या गीतगायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात तो विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस