Raigad News : रायगडमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच सुटणार; सुधारित धोरणाला वेग

मुंबई : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याच्या दृष्टीने शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. दरड, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी सध्याच्या धोरणात आवश्यक बदल करून सुधारित धोरण तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.


मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जमिनीला भेगा पडणे, डोंगर खचणे आणि दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आला. आपत्तीग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी धोरणात बदल करण्यावर चर्चा झाली.



रायगडमधील निसर्ग चक्रीवादळग्रस्त कुटुंबांचा मुद्दा मंत्री भरतशेठ गोगावले यांनी बैठकीत मांडला. चक्रीवादळामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले.


पुनर्वसित गावांमध्ये पात्र कुटुंबांना किमान 500 चौरस फुटांचा स्वतंत्र भूखंड देण्याची तरतूद प्रस्तावित आहे. मूळ जागा त्यापेक्षा मोठी असल्यास उपलब्धतेनुसार त्याच क्षेत्रफळाची पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यायी जागा उपलब्ध नसल्यास संबंधित नियमांनुसार मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे.


महाड आणि पोलादपूरमधील पुनर्वसित गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून या सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.


सध्याच्या धोरणातील आवश्यक बदलांचा समावेश करून सुधारित पुनर्वसन धोरण अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर हे धोरण मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. त्यामुळे रायगडमधील आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.