CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ


मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या धोरणात राज्य शासनाने सुधारणा केली आहे. या अंतर्गत विविध राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च, २०२७ पर्यंत दोषारोपपत्रे (चार्जशीट्स) दाखल होतील, असे खटले आता कायदेशीर तरतुदींनुसार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, यामुळे हजारो राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना, विशेषतः दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या मोर्चांमधील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



सार्वजनिक हिताच्या किंवा विविध सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून घेराव घालणे, मोर्चे काढणे व निदर्शने करणे यांसारखे आंदोलनाचे मार्ग अवलंबले जातात. अशा वेळी कार्यकर्त्यांवर दाखल होणारे खटले मागे घेण्यासाठी शासनाने यापूर्वी २१ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या नियमानुसार ३१ जुलै २०२६ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले खटलेच मागे घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. तथापि, ही मुदत संपल्यामुळे आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची मोठी संख्या पाहता, या कालावधीत वाढ करण्याची बाब गेल्या काही काळापासून शासनाच्या विचाराधीन होती. अखेर गृह विभागाने यामध्ये सुधारणा करत ही मुदत दीड वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च, २०२७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


या सुधारित निर्णयामध्ये राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची बाब समाविष्ट केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि तीव्र आंदोलने झाली होती. या आंदोलनांमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्या वेळी झालेल्या कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी अनेक आंदोलक तरुण आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या न्यायालयीन खटल्यांमुळे अशा आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिक भविष्य धोक्यात येऊ नये, हा संवेदनशील दृष्टिकोन समोर ठेवून त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले हे सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.