Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय


मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य दिले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये 'शासन प्रक्रिया पुनर्रचना' राबविण्यात येणार असून, या विभागाच्या पूर्वीच्या १५ सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता १० करण्यात आली आहे. दस्तनोंदणी, विवाह नोंदणी आणि प्रमाणित नकला मिळविण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण बदल केला. (Chandrashekhar Bawankule)


या नव्या प्रणालीनुसार, समान स्वरूपाच्या अनेक सेवांचे एकत्रीकरण करण्यात आले असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. संगणकीकृत प्रणालीतून दस्तांची प्रमाणित नक्कल देण्याच्या तीन वेगवेगळ्या सेवा एकत्र करून त्यांची एकच सेवा तयार करण्यात आली आहे, तर विशेष विवाह कायद्यांतर्गत येणाऱ्या दोन सेवांचेही एकत्रीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करणे आणि सीलबंद मृत्यूपत्राचा लखोटा जमा करणे यांसारख्या सेवा आता काढून टाकण्यात येणार आहेत. (Chandrashekhar Bawankule)



नव्या बदलांनुसार, नागरिकांना आता वारंवार तीच कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. डिजीलॉकर, आधार, पॅन आणि भूमी अभिलेख यांसारख्या शासकीय प्रणालींशी ही सिस्टीम जोडली जाणार असल्यामुळे आवश्यक माहिती आपोआप घेतली जाईल. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही, तेथे नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या 'गृहभेटीचे' सध्याचे ३०० रुपये शुल्क वाढवून ते ५००० रुपये करण्यात आले आहे. यासोबतच अभिलेख शोधासाठीचे दरही नव्याने सुचवण्यात आले आहेत. (Chandrashekhar Bawankule)


दस्तनोंदणी आणि नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करणे यांसारख्या सेवा आता केवळ १ दिवसात पूर्ण केल्या जातील, अशी सुधारित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी, 'आपले सरकार' आणि 'मैत्री' पोर्टलशी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीचे 'एपीआय'द्वारे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी