Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ अभियानांतर्गत दहिवडी व वडूज येथे तिरंगा रॅली

दहिवडी / वडूज : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या राष्ट्रभक्तीपर अभियानांतर्गत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत नागरिकांनी देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला.


राष्ट्रध्वज हा देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश दिला जात आहे. (Har Ghar Tiranga)



या अभियानात सहभागी होत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.


तिरंग्याच्या सन्मानासाठी आणि राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. (Har Ghar Tiranga)


जय हिंद! वंदे मातरम्!


Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.