Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-बलिया एक्स्प्रेस 17 ऑगस्टपासून, तर दादर-गोरखपूर एक्स्प्रेस 18 ऑगस्टपासून नियमित धावणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील प्रवाशांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित दादर-रत्नागिरी, मुंबई-भुसावळ आणि सह्याद्री एक्स्प्रेससारख्या बंद गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. (Central Railway)



राज्यातील बंद रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोकण विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मार्च 2023 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित मागण्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार रवींद्र वायकर यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर व्यवहार्यता तपासणीचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यानंतरही ठोस निर्णय झालेला नसल्याची नाराजी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया विशेष गाड्यांचे नियमित एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. 01025/01026 दादर-बलिया विशेष गाडीचे 11043/11044 दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये, तर 01027/01028 दादर-गोरखपूर विशेष गाडीचे 11047/11048 दादर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (ganapatI Special Train)


मध्य रेल्वेकडून मार्गक्षमता आणि परिचालनातील अडचणींचे कारण देत महाराष्ट्रातील काही जुन्या गाड्या सुरू करण्यास विलंब होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्याच मार्गावर विशेष गाड्या सुरू करून त्या नियमित केल्या जात असतील, तर महाराष्ट्रातील बंद गाड्यांसाठी मार्गक्षमता का उपलब्ध होत नाही, असा सवाल कोकण विकास समितीने उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील जुन्या गाड्यांचेही पुनर्संचालन करून सर्व प्रदेशांना समान न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (Kokan Train)


दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील 20 अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. रायगडमध्ये 17, रत्नागिरीमध्ये दोन आणि सिंधुदुर्गातील एका ठिकाणाचा यात समावेश आहे. सणासुदीच्या काळात वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता या ब्लॅक स्पॉटवर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी