Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी' (वैचारिक नक्षलवादी) या उल्लेखावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय संसदीय बाबी मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही विरोधी नेत्यांना 'नक्षलवादी मानसिकतेचे' म्हटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 'दिमागी नक्षलवादी' नेमके कोण आहेत हे स्पष्ट करताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत; त्यानुसार, जे नक्षलवाद्यांचे समर्थन करतात आणि भारतीय संविधानाचा स्वीकार करत नाहीत, जे फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहतात आणि कलम ३७० चे समर्थन करतात, तसेच जे भारताच्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांना देशापासून वेगळे करण्यासाठी 'चिकन नेक' कॉरिडोअर तोडण्याची भाषा करतात, तेच 'दिमागी नक्षलवादी' आहेत.



शनिवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशातून सशस्त्र नक्षलवादाचे यशस्वीपणे उच्चाटन केल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले होते आणि सुरक्षा दलांच्या बलिदानाचे स्मरण केले होते. पंतप्रधान म्हणाले होते की, "जंगलात शस्त्र हातात घेणाऱ्या नक्षलवाद्यांचा बिमोड झाला असला, तरी सार्वजनिक जीवनात आणि विविध शासकीय समित्यांमध्ये अजूनही 'दिमागी नक्षलवादी' (नक्षलवादी विचारसरणीचे लोक) सक्रिय आहेत. देशाच्या प्रगतीसाठी अशा लोकांना ओळखणे आणि त्यांना वेगळे करणे आवश्यक आहे."



पंतप्रधानांच्या या भाषणानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी आरोप केला की, दोन-तीन वर्षांपूर्वी राजकीय विरोधकांसाठी 'अर्बन नक्षल' शब्द वापरण्यात आला होता, ज्यावर संसदेत विचारले असता गृह मंत्रालयाने असा कोणताही कायदेशीर शब्द वा व्याख्या अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा विरोधकांसाठी अशा शब्दांचा वापर केला जात आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर