BJP National Executive : विनोद तावडे, पीयूष गोयल, भारती पवार भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत

नितीन नबीन यांच्याकडून नव्या 'टीम'ची घोषणा; महाराष्ट्राला मानाचे स्थान


मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Naveen) यांनी सोमवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या नव्या रचनेत महाराष्ट्रातील नेत्यांना अत्यंत महत्त्वाची पदे देऊन राज्याचे स्थान अधिक बळकट करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुनर्निवड करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची तर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.



भाजपच्या नव्या केंद्रीय संघटनेत राष्ट्रीय उपाध्यक्षपदी एकूण १३ नेत्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा आणि डी. पुरंदेश्वरी यांच्यासोबत महाराष्ट्रातील डॉ. भारती प्रवीण पवार यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांच्यासह सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, डॉ. सतीश पूनिया आणि हरीश द्विवेदी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद कायम ठेवण्यात आले आहे.


केंद्रीय स्तरावरील या फेररचनेत पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची धुरा पीयूष गोयल यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात गोयल यांचे मंत्रिपद अन्य नेत्याकडे दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्यासोबत राजस्थानचे राजेश मंगल हे राष्ट्रीय संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय सोशल मीडिया विभागात महाराष्ट्रातील प्रीती गांधी यांची को-कन्व्हेनर (सह-संयोजक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



युवकांना अधिकाधिक संधी


- भाजपने आपल्या विविध मोर्चांच्या अध्यक्षांचीही नावे जाहीर केली आहेत. यात भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी गुजरातचे डॉ. हेमंग जोशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी छत्तीसगडच्या रूप कुमारी चौधरी आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे अमरपाल मौर्य यांची निवड झाली आहे.
- किसान मोर्चाची जबाबदारी मध्य प्रदेशचे बन्सीलाल गुर्जर, एससी मोर्चाची बिहारचे शिवेश कुमार राम, एसटी मोर्चाची डॉ. मन्नालाल रावत आणि अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी उत्तर प्रदेशचे कुँवर बासित अली यांच्याकडे देण्यात आली आहे.
- केंद्रीय कार्यालय प्रभारी म्हणून तरुण चुघ आणि मीडिया कन्व्हेनर म्हणून अनिल बलुनी काम पाहणार आहेत.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली