Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


कोकणातील पालघरमध्ये आणि मुंबईत हलका पाऊस, तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही मध्यम पावसाचा अंदाज असून या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्याप कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. सोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर नाशिक घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल असा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा वेग काहीसा समानच आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी २० ऑगस्ट रोजी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं अशी शक्यता आहे. एकंदरच, राज्यात सध्यातरी पावसाचा जोर कमी झाला आहे व कोणत्याही प्रकारचे हाय अलर्ट जारी करण्यात आलेले नाहीत.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी