Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना मिळणार आर्थिक मदत

- मत्स्य विभागाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव; ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना होणार लाभ


मुंबई : पावसाळ्यात दोन ते अडीच महिन्यांच्या मासेमारी बंदीच्या काळात मच्छीमार कुटुंबांसमोर निर्माण होणारा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विशेष नियोजन केले आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील गरजू मच्छीमारांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडून वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे.


राज्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी असतो. यंदा हा कालावधी १५ दिवसांनी वाढविण्यात आल्याने १५ ऑगस्टपर्यंत समुद्रात मासेमारी बंद होती. या काळात पारंपरिक मच्छीमारांचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद होतात. विद्यमान योजनेनुसार पात्र मच्छीमारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वार्षिक ४ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, वाढती महागाई आणि ही अपुरी मदत लक्षात घेता, यात वाढ करून ती २० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.


ही मदत सरसकट सर्व मच्छीमारांना देण्याऐवजी खरोखर गरजू असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर राज्य सरकारचा विशेष भर आहे. लाडकी बहीण योजनेच्या अनुभवातून धडा घेत, सरकार आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेत आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात किनारी जिल्ह्यांतील मच्छीमारांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) या संस्थेकडून गरजू मच्छीमारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांची नोंद झाली असून त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो.


मच्छीमारी करणारे काही व्यावसायिक मच्छीमार पर्ससीन नेटने मासेमारी करतात आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, अशाच पात्र आणि गरजू मच्छीमारांना ही आर्थिक मदत दिली जाईल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न