BM C : मुंबईत धूर फवारणीच्या नगरसेवकांची बोंबाबोंब

धूर फवारणींची मशिन्स पडतात बंद


प्रत्येक नगरसेवक प्रभागात एक मशिन्स खरेदीची केली स्थायी समितीत मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुम्र फवारणी आणि औषध फवारणी केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात धुर फवारणींची बोंबाबोंबच आहे. धूर फवारणी करणारी मशिन्स वारंवार बंद पडत असून यामुळे संपूर्ण विभागात धूर फवारणी होत नाही. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात नव्याने मशिन्स खरेदी करण्यात यावीत अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली.



महापालिकेच्या बी विभागात किटक नाशक विभागाच्यावतीने पावसाळ्यातील आजारांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी धूर फवारणी बाबत प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगितले. धूर फवारणी मशिन्सची माहितीही उपलब्ध नाही.त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक मशिन्स उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी केली. तर शिवसेनेचे अमेय घोले यांनी धुर फवारणी करणारे दिसतच नसल्याचे सांगत पहिल्या जागेवर धूर फवारणी केल्यानंतर पुन्हा त्या जागी यायला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो असे सांगितले. तर अद्यापही वॉडनिहाय शेड्युल्ड येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर लेप्टोचे रुग्णही वाढत असल्याने उंदीर मारण्याचा प्रयत्न केला जावा अशी सूचना केली. तर प्रिती सातम यांनी लहानपणी मुले धूर मारणाऱ्यांच्या पाठिशी फिरायचे. परंतु त्यांचे विभाग कव्हरच होत नाही. तर दहा ते पंधरा मिनिटांत मशिन्स बंद पडतात. त्यामुळे हे धूर फवारणी कागदावरच नसावी तर प्रत्यक्षात दिसून यावी आणि त्याचा फायदा जनतेला व्हावा अशी सूचना केली. तर तेजिंदर तिवाना यांनी ही धूर फवारणी म्हणून जनतेच्या डोळयात धुळ फेक आहे. पण अशाप्रकारे धूर फवारणी करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून योग्य आहे का?याचा काही अहवाल आहे का याची माहिती द्यावी. तसेच किती मशिन्स चालू आहे आणि किती बंद आहे याची माहिती द्यावी अशी मागणी केली.


यावेळी झालेल्या चर्चेत यशवंत किल्लेदार, शीतल गंभीर, तुलिफ मिरांडा, रमाकांत रहाटे, लक्ष्मी भाटीया, दिपमाला बढे, श्रध्दा जाधव. मिनाक्षी पाटणकर आदींनी भाग घेत आपल्या विभागातील किटक नाशक विभागासंदर्भात तक्रारी मांडल्या. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सध्या किटक नाशक विभागाच्यावतीने स्टँडबाय काम सुरु आहे. सभागृहनेत्यांसह सर्व नगरसेवकांनी चिंता आणि मागणी केली आहे. त्यादृष्टीकोनातून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा सविस्तर अहवाल सादर केला जावा. कारण सध्या ज्याप्रकारे डेंग्यू आणि मलेरियाची साथ फैलावत आहे, त्याची काळजी घेण्यात प्रशासनाची बेफिकीरी आहे किंवा त्यांची अनभिन्न्नता आहे असेच म्हणावे लागेल असे सांगत चिंता व्यक्त केली.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.